पोस्ट्स

शोले आणि ‘सांभा’ दगड

इमेज
शोले आणि ‘सांभा’ दगड           ‘शोले’ चित्रपट रिलीज होऊन यंदा पन्नास वर्षे झाली. इतक्या वर्षानंतरही चित्रपट रसिकांमध्ये शोलेची जादू अजूनही कायम आहे. त्यातील दृश्ये, संवाद, गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. यातील केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर अगदी लहानात लहान भूमिका करणारेही तितकेच गाजलेत. तुम्हाला “कितने आदमी थे?” असे म्हणत हातातला पट्टा दगडांवर घासत चालणारा गब्बर आठवत असेलच. गब्बरच्या जोडीला  “अरे ओ सांभा!” असा आवाज दिल्यानंतर भल्या मोठ्या दगडावर नेम धरून बसलेला “जी सरदार!” म्हणनारा ‘सांभा’ही डोळ्यांसमोर येत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या आणि गब्बर कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या दगडांची कथाही तितकीच मनोरंजक आहे.       गेली पन्नास वर्षे ‘सांभा’ ज्या राखाडी रंगाच्या दगडांवर बसून गब्बरला उत्तरे देतोय, ज्या दगडांवर ‘जब तक है जान’ म्हणणाऱ्या बसंतीची पावले थिरकलीत, ते दगड तब्बल अडीचशे ते तिनशे कोटी वर्षांपासून तिथे उभे आहेत. बेंगलुरूजवळच्या रामनगरा जिल्ह्यातील हे दगड ‘रामनगर खडक’ याच नावाने ओळखले जातात. याच ...

चिरनेरचा सवतकडा

इमेज
काही ट्रेक हे फक्त डोंगर चढण्यापुरते नसतात.ते स्वतःला थोडंसं नव्याने ओळखण्याचे प्रवास असतात. चिरनेरच्या अक्कादेवी जंगलातून सुरू झालेली ही वाट सुरुवातीला साधी वाटली खरी, पण पुढे पुढे निसर्गाने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. ओले दगड, घसरडी नाळ आणि दाट झाडीमधून काढावी लागणारी वाट. मध्येच एखाद्या दगडावर पाय घसरला, कुणी धडपडलं, तर कुणाच्या कपड्यांवर चिखल उडाला. पण ट्रेकमधल्या अशा छोट्या धडपडीच पुढे आठवणी बनतात. या वाटेची खास गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. शहरातल्या सरळ रस्त्यांची सवय असलेल्या पायांना इथं निसर्गाचा स्वभाव समजतो. कुठे आधारासाठी झाडाची फांदी पकडावी लागते, तर कुठे दगडावर बसून श्वास सावरावा लागतो. आणि मग अचानक धुक्याच्या पडद्याआडून समोर येतो तो सवतकडा. वर पोहोचल्यानंतरचा तो क्षण म्हणजे सगळी दमछाक विसरवणारा असतो. अंगावर थंड वारा, खाली हिरवी दरी आणि मित्रांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा आनंद. त्या कड्यावर बसून केलेलं वनभोजन म्हणजे फक्त जेवण नव्हतं. ती भूकही वेगळी होती आणि त्या जेवणाची चवही. पावसाच्या वातावरणात, निसर्गाच्या साक्षीने खाल्लेला साधा घाससुद्...

विजयाची घंटा!

इमेज
विजयाची घंटा!     रायगड जिल्ह्यातील सरसगडाच्या पायथ्याशी असलेले अष्टविनायकांपैकी एक देवस्थान म्हणजे पालीचा बल्लाळेश्वर.  येथून जवळच्या सुधागडावरील एक श्रद्धास्थान भोराईदेवी.  अलिबागजवळील प्राचिन कनकेश्वर आणि श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर; रायगड जिल्ह्यातील ही सर्व सुप्रसिद्ध श्रीक्षेत्रे. यापैकी पाली, हरिहरेश्वर आणि कनकेश्वर ही क्षेत्रे तशी नेहमीच भक्तांनी गजबजलेली. गणेश, शिव, हरिहर आणि शक्ती यांसारखी उपास्य देवतांमध्ये विविधता असणाऱ्या ही स्थाने. या चार वेगवेगळ्या देवस्थानांची एकत्रितपणे चर्चा करण्यासारखे काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे, जी या मंदिरांना एका समान धाग्याने जोडते? या सर्व क्षेत्रांतील समान गोष्ट म्हणजे या मंदिरांतील घंटा! “आगमनार्थ तु देवानां, गमनार्थ तु राक्षसाम। कुरू घंटे रवं तत्र देवताहा न लक्षणम।।” अर्थात ‘हे घंटे, देवतांच्या आगमनासाठी आणि असुरांना पळवून लावण्यासाठी, तू देवतांना पुकारणारा नाद कर!’ असे घंटेच्या बाबतीत म्हटले जाते. घंटा ही हिंदू, जैन, ख्रिश्चन या धर्मात  विशेष महत्त्व असणारी वस्तू.  सर्वसाधारणपणे मंदिरांच्या प्रवेशद्वार...

मिशीवाले मारूती

इमेज
मिशीवाले मारूती ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'        पुराणकाळांत वर्णन केलेले हे सात चिरंजीव. हनुमंत अर्थात मारूतीराया यांपैकीच एक. यातील उर्वरीत चिरंजीवांचे ठाऊक नाही, पण हनुमंत मात्र मूर्तीरुपाने तरी चिरंजीवच झाल्यासारखा आहे. कारण भारतातील कित्येक गावांत मंदिरांमध्ये, गावाच्या वेशीवर अथवा एखाद्या पिंपळाखाली शेंदुर फासलेला, रंगरंगोटी केलेला मारुती आढळतो. दास्यभक्ती करणाऱ्यांसाठी आचार्य, मल्लांसाठी उपास्य देव, तंत्रमार्गातील दैवत आणि भूत-प्रेत-पिशाच्च बाधेपासून सोडविणारा  अशा अनेक रूपात मारुती प्रसिद्ध आहे. सुमारे साडे तीनशे वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी हनुमंत उपासनेला चांगलाच उजाळा दिला, त्याचप्रमाणे उत्तर भारतात गोस्वामी तुलसीदास यांनीही मारुती भक्तीचा भरपूर प्रचार केला. पुराणांच्या मते मारुतीच्या पित्याचे नाव केशरी व आईचे अंजनी आहे. अकराव्या रुद्राने मारुतीच्या रूपात अंजनीच्या पोटी अवतार घेतल्याचे मानले जाते. काहीवेळेस तो ‘पवनपुत्र’ म्हणूनही ओळखला जातो. पुढे हा प्रबल पराक्रमी आणि महा...

धवलारीण

इमेज
शेती व्यवसायाशी संबंधित सर्वच समाजांमध्ये सण, समारंभ साजरा करण्याचा दिवस, एकूण कालावधी शेतीकामांतून मिळणारी उसंत, उत्पादन यांवर अवलंबून असतो. भातशेती करणाऱ्या समाजाला कापणी, मळणीनंतर बऱ्यापैकी आराम मिळतो. बहुदा या कारणांमुळेच तुलसीविवाहानंतर विवाहोत्सुक उमेदवारांची लग्नकार्ये उरकली जातात. वधू, वर आणि घरच्यांची संमती या तीन घटकांचे एकमत झाले की पुढची तयारी सुरू होते. विवाहाचा अंदाजे दिवस ठरवताना आणखी एक महत्वाची बाब पाहीली जाते, ती म्हणजे या तारखेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता. यात लग्नाचा हॉल, मांडव, वाजंत्री, पुरोहीत, आचारी हे सर्व उपलब्ध होतील याची खात्री केली जाते. खारेपाटातल्या आगरी, कोळी समाजात मात्र, या सर्वांसह आणखा एका बाबीची खातरजमा केली ती म्हणजे, ‘धवलारीण उपलब्ध आहे का? धवलारीण पारंपरिक पद्धतीने लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते, त्यामुळे तिच्याशिवाय लग्नसोहळा पार पडणे अशक्यच. एखाद्या पुरोहिताप्रमाणेच काम बजावणारी ‘धवलारीण‘ म्हणजे तरी नेमकं काय? याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे “धवले गाते ती धवलारीण!” अशा वेळी पुन्हा प्रश्न येईल की, ‘धवले म्हणजे क...

‘निरा’ हे सदा के लिए!

इमेज
  श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. या राजवंशातील ‘छित्तराजा’चा मुरूडजवळील भोईघर येथे सापडलेला एक ताम्रपट आहे. इसवी सन १०२४च्या या ताम्रपटात नारळ, फणस, चाफा, आंबा यांवरील कर पद्धतीची माहिती दिली आहे. या ताम्रपटातील एका वाक्याची अंमलबजावणी अगदी हजार वर्षानंतरही कायम आहे. ही ओळ अशी आहे- ‘सुरामण्डवृक्षश्चाभ्यन्तरवर्ती बाह्यो वा राजकीय एव’ म्हणजे, ‘ज्या वृक्षांपासून ‘सुरा’ अर्थात दारू निघते, ते सर्व वृक्ष बाहेर असोत वा आत, राजाच्या/सरकारच्या अखत्यारीत आहेत!’ अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध ‘सरकारमान्य’ या शब्दाचा उगम अशाच आदेशांमध्ये असल्याचे सांगता येईल. आधुनिक काळातही ताड, माड, खजूर, शिंदी यांसारखे तालवृक्ष सरकारच्या अखत्यारीत येतात. पर्यायाने या वृक्षांशी निगडीत व्यवसायांवर देखील सरकारची नजर असते. आपणही इथे अशाच एका सुरावृक्षाशी संबंधित ‘सरकारमान्य’ व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत; फरक इतकाच की- आपण ‘सुरे’च्या वाकड्या मार्गात न शिरता सरळमार्गाने ‘निरा’ व्यवसायाकडे वळणार(!) आहोत. उन्हाच्या दिवसांमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला...