पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते

इमेज
मराठी ज्ञानाची भाषा होऊ शकते! ( कोकण मराठी साहीत्य परिषद आयोजित निबंध स्पर्धेत, शिक्षक गट प्रथम क्रमांक)        जगभरात सुमारे सहा हजार भाषा बोलल्या जातात. यातील  कित्येक भाषा प्रतिवर्षी मरण पावतात. वाचायला थोडे चमत्कारिक वाटेल पण हे खरे आहे; भाषांचाही मृत्यू होतो. विशिष्ट भाषा वापरणाऱ्यांचे प्रमाण शून्यावर येणे, व्यवहारातून  वापर नाहीसा होणे म्हणजेच भाषेचे मरण. त्याचबरोबर कित्येक भाषांमध्ये लक्षणीय बदल घडत असतात. सर्वाधिक भाषिक लोकसंख्येच्या यादीत मराठी भाषेचा एकोणिसावा क्रमांक लागतो. जगभरातील अकरा कोटीहून अधिक लोक मराठी भाषेचा वापर करतात. ही भाषा बोलणारे लोक (जागतिक स्तरावर)  ७२ देशांमध्ये पसरलेले आहेत.भारतातल्या ३५ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत मराठी भाषिक लोक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यामुळे ती केवळ एखाद्या प्रांताची भाषा न राहता, राष्ट्रीय भाषा ठरते. संविधानाने मान्य केलेल्या २२ राजभाषांपैकी मराठी ही एक राजभाषा आहे. शिलाहार, यादव काळातील कित्येक शिलालेख, ताम्रपटांवर संस्कृतसह मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवकाळात इंग्...

झिम्मा खेळणारा कोकणचा राजा

इमेज
झिम्मा खेळणारा कोकणचा राजा       आपला देश म्हणजे विविध रंगांच्या, विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांनी तयार झालेली एकप्रकारची गोधडीच. प्रत्येक प्रदेशाच्या संस्कृतीचे व आचार, विचारांचे तुकडे यात सामावलेले आहेत. भैगोलिक विविधतेमुळे हे तुकडे स्वतंत्र वाटत असले, तरी संस्कृतीच्या समान धाग्याने ते एकत्र जोडलेले आहेत. या सांस्कृतिक जोडणीमुळे हा देश अधिकच रंगीबेरंगी, मायेची उब देणारा ठरला आहे. या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात समोर येत असतात. ‘लोकगीत’ नावाचा प्रकारही असाच, संस्कृतीचे दर्शन घडवणारा. या लोकगीतांतही  प्रदेशानुसार प्रकार दिसून येतात. लोकजीवनाशी जोडलेली संस्कारगीते, ऋतुगीते, श्रमगीते, नृत्यगीते तसेच विविध सण-उत्सवप्रसंगी गायिली जाणारी गाणी सर्वत्रच आढळतात. देशातील लोकगीतांची परंपरा  प्राचीन काळापासूनच आहे. ती परंपरा वैविध्यपूर्ण आहेच, पण त्याचबरोबर समृद्धही आहे.        पूर्वी ‘कुलाबा’ असे नामकरण असलेला रायगड जिल्हा खरंतर कोकण प्रांताचाच एक भाग. वसई, ठाणे प्रांतापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते अगदी गोव...

भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!

इमेज
भरघोस पीकासाठी पालाची जत्रा!     भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यात खरिपात म्हणजेच पावसाळी हंगामात प्रामुख्याने भातशेती होते. जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड होते, यंदाही होण्याची शक्यता आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहील्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले. मध्यंतरी फोनच्या नेटवर्कप्रमाणे अचानक गायब झालेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. या पावासामुळे लावणीच्या हंगामाला सुरूवात होईल; काही भागात भात लावणीला प्रारंभदेखील झाला आहे. योग्य वातावरणाचा फायदा घेत सर्वत्र भात लावणी होत असली, तरी काही गावांमध्ये मात्र लावणी सुरू होण्यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पहावी लागते. संपूर्ण गावात ‘तो’ विशिष्ट दिवस आल्याशिवाय लावणी करायची नाही असे संकेत आहेत. आधुनिक काळात असे खरेच कुठे घडते का?      मुंबई-गोवा महामार्गालगत पेण तालुक्यातील जिते नावाचे एक सर्वसामान्य गाव. या गावात जुलै महीन्याच्या पहील्या आठवड्यात एक जत्रा संपन्न झाली. महाराष्ट्रातील विविध जत्रांचा हंगाम कधीचाच संपून गेला असताना, भर पावसात ही कसली जत्रा भरते याचेच...

रुचकर मिठाचा प्रवास

इमेज
रुचकर मिठाचा प्रवास (मुंबई सकाळ, रायगड टुडे 1 जुलै 2019) http://product.sakaalmedia.com/portal/SM.aspx?ID=137799     ‘जोहान अल्ब्रेट डी मन्डेलस्लो’ असे भले मोठे नाव असलेला एक जर्मन साहसी पर्यटक. सतराव्या शतकात तो भटकंतीच्या इराद्याने इराण, भारत या देशांत फिरला. आपल्या प्रवास वर्णनाच्या नोंदींमध्ये त्याने रायगडवासीयांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण नोंद केली. भारतातील ‘ ओरानु-बाम्मारा ’ येथे मीठ तयार होत असल्याचे त्याने लिहिले. या परिसरात सोलर टेबल सॉल्टचे कारखाने असून मीठाची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असल्याचेही त्याने म्हटलेय. 1638 सालातली ही गोष्ट. मन्डेलस्लोच्या नोंदीतील ‘ओरानु-बाम्मारा’ म्हणजे खरंतर ‘उरण-मुंबई’. त्याने पाहीलेले सोलर टेबल सॉल्टचे कारखाने म्हणजे येथील मीठागरे. या नोंदींचा विचार केल्यास रायगडच्या किनारपट्टीवरील मीठव्यवसाय किमान चारशे वर्षांपासून असल्याचे म्हणता येईल. पण रायगडच्या मीठाची ही चविष्ट परंपरा केवळ इतकीच जुनी नाही, तर त्याच्या काहीशे वर्षे आधीचेही पुरावे आहेत. उरण तालुक्यातील सर्वात जुनी लिखित नोंद असलेल्या ‘पिरकोन-आवरे’ ताम्रपटातही मीठव्...