पोस्ट्स

कशासाठी? पोटासाठी!

इमेज
  कशासाठी? पोटासाठी!          जागतिक भूक दिनाच्या निमित्ताने जगभरात उपासमार, कुपोषण आणि अन्नसुरक्षेवर चर्चा होत असताना शहरांच्या रस्त्यांवर एक वेगळंच वास्तव रोज फिरताना दिसतं. ही माणसं कोणत्याही परिषदेत दिसत नाहीत, त्यांच्यावर मोठ्या चर्चाही होत नाहीत. पण शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि पुनर्वापराच्या साखळीचा एक शांत भाग म्हणून ती रोज जगत असतात. पहाटेच्या धूसर प्रकाशात, उन्हाच्या चटक्यात किंवा पावसाच्या सरींत, तीनचाकी सायकल ढकलत भंगार गोळा करणारी माणसं शहराच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतात. त्यांच्या सायकलीवर लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने वर्तमानपत्र, तुटलेल्या वस्तू आणि त्यासोबत आयुष्याचं ओझंही बांधलेलं असतं.         नवी मुंबईत सायकल चालवणारे जवळपास सगळेच जण पोटासाठी सायकल चालवत असतात. फरक इतकाच असतो की, एक जण आपले पोट कमी व्हावं म्हणून सायकल चालवत असतो, तर दुसरा आपलं पोट भरता यावं म्हणून. एका बाजूला सकाळी ट्रॅकसूट घालून फिटनेससाठी सायकल चालवणारे चेहरे दिसतात, तर दुसऱ्या बाजूला उन्हातान्हात तीनचाकी सायकलवर भंगार वाहत जगण्याची ध...

गायत्री आणि सविता

इमेज
  गायत्री आणि सविता           उन्हाळा यंदा अक्षरशः अंगाची लाही लाही करणारा ठरतो आहे. सकाळीच सूर्य डोक्यावर आल्यासारखा भासतो. दुपारी रस्त्यावरून चालताना पायाखालची जमीन तापलेली जाणवते आणि एखादी सावली म्हणजे जणू वरदान वाटते. पण या कडक उन्हातही एक गोष्ट सतत जाणवत राहते, सूर्याशिवाय जीवन नाही. झाडांच्या पानांपासून माणसाच्या श्वासापर्यंत सर्व काही कुठेतरी सूर्याशी जोडलेले आहे. म्हणूनच वैदिकांनी सूर्याला केवळ आकाशातील तेजस्वी गोळा म्हणून पाहिले नाही. त्यांनी त्यामागे कार्यरत असलेल्या दिव्य चेतनेचा अनुभव घेतला.  त्या चेतनेचे नाव आहे, सविता . आपण रोज म्हणत असलेला प्रसिद्ध गायत्री मंत्र हा प्रत्यक्षात सविता देवतेला उद्देशून आहे. ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यंभर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् ॥ या मंत्राचा अर्थ साधा पण अत्यंत गूढ आहे.   “त्या श्रेष्ठ, तेजस्वी सविता देवतेच्या दिव्य प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. तो प्रकाश आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.” महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ गायत्री ’ हे मूळ देवतेचे नाव नाही. गायत्री हा एक वैदिक छंद आहे. तीन चरण आणि प...

वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

इमेज
  वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.     किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात -  EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...

गंगावतरण आणि गंगाधर शिव

इमेज
गंगावतरण आणि गंगाधर शिव        आपली संस्कृती किती गूढ, किती भावपूर्ण आहे, हे गंगेच्या स्मरणातून सहज उमजतं. गंगा ही केवळ एक नदी नाही, तर ती स्मृती आहे, ती श्रद्धा आहे, आणि ती जीवनाच्या अखंड प्रवाहाची साक्ष आहे. म्हणूनच गंगासप्तमीसारखी तिथी आपल्या आयुष्यात येते आणि आपल्याला त्या पवित्र प्रवाहाशी पुन्हा एकदा जोडून जाते.    पौराणिक कथांमध्ये सांगितलेला गंगावतरणाचा प्रसंग केवळ ऐकण्यापुरता नाही, तर तो आपल्या कलेत, शिल्पात आणि संस्कृतीत जिवंत आहे. मुंबई आणि नवी मुंबईच्या समुद्राच्या कुशीत वसलेल्या घारापुरीच्या लेण्यांमध्ये हा प्रसंग अक्षरशः दगडात गोठवलेला दिसतो. येथे उभी असलेली गंगाधर शिवमूर्ती म्हणजे एक शिल्प नसून एक संपूर्ण कथा आहे, एक भावविश्व आहे.  या शिल्पात सुमारे पाच मीटर उंच असलेले शिव आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली पार्वती, या दोघांच्या मध्यभागी गंगेचा अवतरणाचा क्षण पकडलेला आहे. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकणार नाही, म्हणून तिला आपल्या जटांमध्ये धारण करणारा शिव; ही कल्पना जितकी विराट, तितकीच नाजूकपणे शिल्पकाराने व्यक्त केली आहे. शिवाच्या जटां...

बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा

इमेज
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं. शिवर...

सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा

इमेज
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं. १९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं. मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते. पायाजवळ कोरलेले हंस...

वीरगळांचे कोडे

इमेज
  वीरगळांचे कोडे .            २९ जानेवारी, भारतीय कोडे दिन! शब्दांच्या खेळातून विचारांना दिशा देणारा, आणि प्रश्न विचारण्याची कला साजरी करणारा हा दिवस. शाळांमध्ये मुलं कोडी सोडवतात, हसतात, विचार करतात, आणि नकळत एक मोठं शिक्षण घेतात. ‘प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं म्हणजेच जगण्याची कला शिकणं.’ आपल्या संस्कृतीत कोड्यांचा उगम खूप जुना आहे. संत ज्ञानेश्वरांनी, तुकारामांनी, अगदी लोककवितांमधील स्त्रियांनीही कोड्यांच्या माध्यमातून गूढ विचार मांडले. कोड्याचं सौंदर्य हे असतं की ते उलगडलं की आनंद मिळतो, आणि न उलगडलं तरी विचार मिळतो.      पण आज मी एका वेगळ्या कोड्याबद्दल बोलू इच्छितो, दगडात कोरलेल्या कोड्याबद्दल. नवी मुंबईलगतच्या परिसरात तळोजा, उरण, पिरकोन, दिघोडे, पुनाडे आणि आवरे या गावांमध्ये काही शांत, उभट शिळा दिसतात. गावाच्या वेशीजवळ, एखाद्या मंदिराच्या कोपऱ्यात किंवा झाडांच्या सावलीत त्या उभ्या असतात. कोणाचं लक्ष नसलेली ही शिळा म्हणजेच वीरगळ. दगडावर कोरलेले योद्ध्यांचे आकृतीबंध, धनुष्य, तलवारी, घोडे आणि आकाशात कोरलेला सूर्य–चंद्र यांच...

पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला

इमेज
पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला  डोंगर माणसाच्या आयुष्यात केवळ भौगोलिक रचना नसतात; ते त्याच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि संघर्षाचे साक्षीदार असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्यावर, प्रत्येक दरीत एखादी कथा दडलेली असते, कधी रणाची, कधी अध्यात्माची, तर कधी निसर्गाशी एकरूप झालेल्या मानवी अस्तित्वाची. अशा असंख्य डोंगरांपैकी रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वत एक वेगळीच ओळख ठेवतो. ११ डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने या पर्वताचा मागोवा घेतला, तर तो केवळ भूगोल नव्हे तर इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेची एकत्रित कहाणी उलगडतो. उरणजवळ समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला हा द्रोणागिरी पर्वत समुद्रकाठच्या वाऱ्याशी संवाद साधत उभा आहे. सकाळच्या सूर्यकिरणांत न्हालेला हा किल्ला पाहताना एखाद्या जुन्या योद्ध्याची छबी डोळ्यांसमोर उभी राहते. एकेकाळी यादव, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अखेर मानाजी आंग्रे यांच्या हातून गेलेल्या या किल्ल्याने असंख्य संघर्ष पाहिले आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तीन चर्च उभारली होती; त्यांच्या अवशेषांत आजही त्या काळाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. पण द्र...

सतीशिळा ते सतीबंदी

इमेज
  सतीशिळा ते सतीबंदी       सह्याद्रीच्या परिसरात भटकताना एखादा कोरलेला दगड दिसतो—त्यावर हाताचा ठसा, बांगड्यांची वलये, काही आकृत्या, शिलालेखांचे तुटलेले ओळी. हे केवळ दगड नसतात, तर काळाच्या ओघात गहाळ झालेल्या कथा असतात. अशा दगडांना लोक ‘सतीशिळा’ म्हणतात. पतीच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या स्त्रीच्या स्मरणार्थ तिच्या कुटुंबीयांनी किंवा गावकऱ्यांनी उभारलेली ही स्मारकशिळा म्हणजे सतीच्या ‘सहगमन’ प्रथेची निःशब्द साक्ष आहे.   सतीशिळा हा फक्त दगड नाही; तो एका काळाचा, एका समाजाचा आरसा आहे. मध्ययुगीन काळात सती प्रथा व्यापक होती. समाजाने त्याला धर्मरूप दिलं होतं, आणि या प्रथेमुळे असंख्य स्त्रिया जिवंत जळल्या. त्यांच्या स्मरणार्थ उभारल्या गेलेल्या शिळा—त्या स्त्रीच्या सन्मानासह , तिच्या बलिदानाची अभिव्यक्ती बनल्या. या शिळांचा अभ्यास केवळ ऐतिहासिक नव्हे तर मूर्तिशास्त्रीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. सतीशिळांवर कोरलेल्या प्रतिमांमध्ये एक विशिष्ट रचना आणि प्रतीकात्मकता दिसते. बहुतेक शिळांवर सती स्त्रीचा उजवा हात उंचावलेला दाखवतात—हा हात ‘आशीर्वाद’ किंवा ‘सन्मान’ या...

रात्र फिरस्ती

इमेज
 रात्र फिरस्ती रात्र म्हणजे फक्त अंधार नसतो. कधी कधी तो निसर्गाचा दुसरा चेहराही असतो. दिवसाच्या गडबडीत दिसत नाहीत अशा अनेक गोष्टी रात्री शांतपणे आपल्या समोर उलगडत जातात. १९ ऑक्टोबर २०२५ ची रात्र अशीच काहीशी वेगळी ठरली. फ्रेंड्स ऑफ नेचर अर्थात ‘फॉन’ संस्थेने आयोजित केलेल्या “रात्र फिरस्ती व वनभोजन” कार्यक्रमासाठी आम्ही चिरनेर येथील बापूजी देव देवराई परिसरात जमलो. सायंकाळचे सात वाजले होते. शहरात त्या वेळेला दिवे लागले असतील, रस्त्यांवर हॉर्न वाजत असतील. पण देवराईच्या वाटेवर मात्र वेगळंच जग हळूहळू जागं होत होतं. पहिल्यांदा अंधारात चालताना पावलं थोडी सावधच पडतात. मोबाईलचे दिवे बंद केल्यावर तर जंगल अधिक जिवंत वाटू लागलं. पानांची सळसळ, दूरवरून येणारे आवाज, कधीतरी झाडांच्या फांद्यांवरून होणारी हालचाल… प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेत होती. Night Trail हा शब्द ऐकायला आकर्षक वाटतो. पण प्रत्यक्षात त्या वाटेवर चालताना निसर्गाकडे बघण्याची आपली सवयच बदलत जाते. दिवसा दुर्लक्षित राहणारे छोटे छोटे जीव त्या रात्री मुख्य पात्र बनले होते. एखादा चमकणारा कोळी, पानामागे लपलेला बेडूक, ओलसर जमिनीत वाढले...