पोस्ट्स

कशासाठी? पोटासाठी!

इमेज
  कशासाठी? पोटासाठी!          जागतिक भूक दिनाच्या निमित्ताने जगभरात उपासमार, कुपोषण आणि अन्नसुरक्षेवर चर्चा होत असताना शहरांच्या रस्त्यांवर एक वेगळंच वास्तव रोज फिरताना दिसतं. ही माणसं कोणत्याही परिषदेत दिसत नाहीत, त्यांच्यावर मोठ्या चर्चाही होत नाहीत. पण शहराच्या अर्थव्यवस्थेचा आणि पुनर्वापराच्या साखळीचा एक शांत भाग म्हणून ती रोज जगत असतात. पहाटेच्या धूसर प्रकाशात, उन्हाच्या चटक्यात किंवा पावसाच्या सरींत, तीनचाकी सायकल ढकलत भंगार गोळा करणारी माणसं शहराच्या कानाकोपऱ्यात फिरताना दिसतात. त्यांच्या सायकलीवर लोखंडाचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, जुने वर्तमानपत्र, तुटलेल्या वस्तू आणि त्यासोबत आयुष्याचं ओझंही बांधलेलं असतं.         नवी मुंबईत सायकल चालवणारे जवळपास सगळेच जण पोटासाठी सायकल चालवत असतात. फरक इतकाच असतो की, एक जण आपले पोट कमी व्हावं म्हणून सायकल चालवत असतो, तर दुसरा आपलं पोट भरता यावं म्हणून. एका बाजूला सकाळी ट्रॅकसूट घालून फिटनेससाठी सायकल चालवणारे चेहरे दिसतात, तर दुसऱ्या बाजूला उन्हातान्हात तीनचाकी सायकलवर भंगार वाहत जगण्याची ध...

गायत्री आणि सविता

इमेज
  गायत्री आणि सविता           उन्हाळा यंदा अक्षरशः अंगाची लाही लाही करणारा ठरतो आहे. सकाळीच सूर्य डोक्यावर आल्यासारखा भासतो. दुपारी रस्त्यावरून चालताना पायाखालची जमीन तापलेली जाणवते आणि एखादी सावली म्हणजे जणू वरदान वाटते. पण या कडक उन्हातही एक गोष्ट सतत जाणवत राहते, सूर्याशिवाय जीवन नाही. झाडांच्या पानांपासून माणसाच्या श्वासापर्यंत सर्व काही कुठेतरी सूर्याशी जोडलेले आहे. म्हणूनच वैदिकांनी सूर्याला केवळ आकाशातील तेजस्वी गोळा म्हणून पाहिले नाही. त्यांनी त्यामागे कार्यरत असलेल्या दिव्य चेतनेचा अनुभव घेतला.  त्या चेतनेचे नाव आहे, सविता . आपण रोज म्हणत असलेला प्रसिद्ध गायत्री मंत्र हा प्रत्यक्षात सविता देवतेला उद्देशून आहे. ॐ भूर्भुवः स्वःतत्सवितुर्वरेण्यंभर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयात् ॥ या मंत्राचा अर्थ साधा पण अत्यंत गूढ आहे.   “त्या श्रेष्ठ, तेजस्वी सविता देवतेच्या दिव्य प्रकाशाचे आम्ही ध्यान करतो. तो प्रकाश आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.” महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ गायत्री ’ हे मूळ देवतेचे नाव नाही. गायत्री हा एक वैदिक छंद आहे. तीन चरण आणि प...

वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया

इमेज
  वेताळदेव आणि एम्प्रेस ऑफ इंडिया समुद्रावरून अलिबागच्या थळ जेटीकडून होडी निघते आणि थोड्याच वेळात उंदेरीला वळसा घालून खांदेरीच्या जवळ येऊ लागतो. दूरून दिसणारा दीपगृहाचा मनोरा, भोवती पसरलेले खडक, आणि लाटांवर डोलणारं बेट. किल्ल्यावर पाय ठेवताच जाणवतं, ही जागा फक्त पाहण्याची नाही, तर अनुभवण्याची आहे. खाऱ्या वाऱ्यात भूतकाळ मिसळलेला आहे. मुंबई बंदराच्या दक्षिणेस सुमारे १७ कि.मी. वर व मुख्य भूमीपासून सुमारे चार कि.मी. वर असणारे हे खांदेरी बेट.     किल्ल्याच्या एका टोकाला, खडकांच्या आडोशाला वेताळदेवाचं मंदिर उभं आहे.  साधं, लहानसं देवस्थान. आत शिरल्यावर गोंगाट मागे राहतो आणि एक शांत थर मनात बसतो. मंदिरात टांगलेल्या काही घंटा दिसतात. त्यातली एक घंटा मात्र लगेच लक्ष वेधून घेते. आकाराने मोठी, धातूवर काळाचे ठसे. हात लावला की तिचा थंड स्पर्श जाणवतो आणि मग नजरेला तिच्यावरची अक्षरं दिसतात -  EMPRESS OF INDIA 1891 क्षणभर थांबावं लागतं. ही घंटा इथे कशी आली असेल ही साधी देवळातील वस्तू नाही. ती एका मोठ्या  जहाजाची घंटा आहे. एम्प्रेस ऑफ इंडिया नावाचं जहाज. १८९१ साली इंग्लंडमध...

बेलापूरचा किल्ला: मराठ्यांच्या सागरी पाऊलखुणा

इमेज
समुद्र म्हणजे विशालतेचं प्रतीक. लाटांच्या ओघात वाहणारी शांतता आणि आत दडलेली ताकद दोन्ही एकाचवेळी जाणवतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या समुद्राची ताकद ओळखली आणि किनाऱ्याच्या प्रत्येक वळणावर आपले अस्तित्व उमटवले. मराठा साम्राज्य केवळ डोंगरदऱ्यांमध्ये नव्हे, तर लाटांवरही उभं राहावं, हे त्यांचं स्वप्न होतं. त्या स्वप्नाच्या साक्षीदारांपैकी एक आहे... बेलापूरचा किल्ला. शिवाजी महाराजांनी थेट बेलापूर किल्ला जिंकला नसला तरी, त्यांनी उभारलेल्या आरमाराच्या आणि स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता, हे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला, पनवेल खाडीच्या किनारी वसलेलं बेलापूर हे गाव एकेकाळी सागरी व्यापाराचं केंद्र होतं. या खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आक्रमणांना रोखण्यासाठी पोर्तुगीजांनी इ.स. १५६० च्या सुमारास हा किल्ला उभारला. तो काळ समुद्रावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा होता. अरब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रज या सगळ्यांनी सागराच्या किनाऱ्याकडे लोभाने पाहिलं. परंतु नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने या समुद्राला स्वराज्याच्या सीमेचा भाग बनवलं. शिवर...

सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा

इमेज
सिद्धेश्वरातील सृष्टीकर्ता ब्रम्हा ठाण्याच्या गर्दीतून थोडं बाजूला वळलं की शहराचं रूप शांत होतं. सिग्नल आणि ट्रॅफिक मागे टाकत सिद्धेश्वर तलावाजवळ पोहोचलं की, वातावरणात एक वेगळी निवांतता जाणवते. त्या तलावालगत असलेलं सिद्धेश्वर राम मंदिर दिसतं आणि मंदिराच्या एका काचेच्या पेटीत एक दुर्मिळ शिल्प उभं आहे, चतुर्मुख ब्रह्मदेवाचं. १९९५ मध्ये हे शिल्प सिद्धेश्वर तलावाजवळ सापडलं. साधारण आठव्या शतकातील ही मूर्ती शिलाहारकालीन कलाशैलीचा उत्तम नमुना मानली जाते. शिल्पाची उंची साधारण साडेचार फूट असून ते काळ्या दगडात कोरलेले आहे. समोर तीन आणि मागे एक अशी ही चतुर्मुख मूर्ती आज भग्न अवस्थेत असली, तरी तिच्या प्रत्येक रेषेत त्या काळातील कलाकौशल्य जाणवतं. मूर्तीचं चेहरं शांत आणि गंभीर आहे. तीन मुखांतील प्रत्येक भाव वेगळा. एक ज्ञानमग्न, एक स्मितहास्यपूर्ण आणि एक स्थिर. पाठीमागे कोरलेलं चौथं मुख थोडं झिजलेलं आहे, पण त्या झिजेतूनही काळाचा ठसा उमटलेला जाणवतो. शिरावर कोरलेला जटा-मुकुट, कपाळावर रेषा, आणि अंगावरील अलंकार या सर्व गोष्टींमध्ये शिलाहारकालीन दगडी शिल्पकलेची मृदु लय स्पष्ट दिसते. पायाजवळ कोरलेले हंस...

पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला

इमेज
पर्वत दिन आणि द्रोणागिरी किल्ला  डोंगर माणसाच्या आयुष्यात केवळ भौगोलिक रचना नसतात; ते त्याच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे आणि संघर्षाचे साक्षीदार असतात. प्रत्येक डोंगराच्या कड्यावर, प्रत्येक दरीत एखादी कथा दडलेली असते, कधी रणाची, कधी अध्यात्माची, तर कधी निसर्गाशी एकरूप झालेल्या मानवी अस्तित्वाची. अशा असंख्य डोंगरांपैकी रायगड जिल्ह्यातील द्रोणागिरी पर्वत एक वेगळीच ओळख ठेवतो. ११ डिसेंबरला साजरा होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिना’च्या निमित्ताने या पर्वताचा मागोवा घेतला, तर तो केवळ भूगोल नव्हे तर इतिहास, पर्यावरण आणि जैवविविधतेची एकत्रित कहाणी उलगडतो. उरणजवळ समुद्राच्या सान्निध्यात उभा असलेला हा द्रोणागिरी पर्वत समुद्रकाठच्या वाऱ्याशी संवाद साधत उभा आहे. सकाळच्या सूर्यकिरणांत न्हालेला हा किल्ला पाहताना एखाद्या जुन्या योद्ध्याची छबी डोळ्यांसमोर उभी राहते. एकेकाळी यादव, पोर्तुगीज, आदिलशाही आणि अखेर मानाजी आंग्रे यांच्या हातून गेलेल्या या किल्ल्याने असंख्य संघर्ष पाहिले आहेत. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे तीन चर्च उभारली होती; त्यांच्या अवशेषांत आजही त्या काळाचे प्रतिध्वनी ऐकू येतात. पण द्र...

रात्र फिरस्ती

इमेज
 रात्र फिरस्ती रात्र म्हणजे फक्त अंधार नसतो. कधी कधी तो निसर्गाचा दुसरा चेहराही असतो. दिवसाच्या गडबडीत दिसत नाहीत अशा अनेक गोष्टी रात्री शांतपणे आपल्या समोर उलगडत जातात. १९ ऑक्टोबर २०२५ ची रात्र अशीच काहीशी वेगळी ठरली. फ्रेंड्स ऑफ नेचर अर्थात ‘फॉन’ संस्थेने आयोजित केलेल्या “रात्र फिरस्ती व वनभोजन” कार्यक्रमासाठी आम्ही चिरनेर येथील बापूजी देव देवराई परिसरात जमलो. सायंकाळचे सात वाजले होते. शहरात त्या वेळेला दिवे लागले असतील, रस्त्यांवर हॉर्न वाजत असतील. पण देवराईच्या वाटेवर मात्र वेगळंच जग हळूहळू जागं होत होतं. पहिल्यांदा अंधारात चालताना पावलं थोडी सावधच पडतात. मोबाईलचे दिवे बंद केल्यावर तर जंगल अधिक जिवंत वाटू लागलं. पानांची सळसळ, दूरवरून येणारे आवाज, कधीतरी झाडांच्या फांद्यांवरून होणारी हालचाल… प्रत्येक गोष्ट आपलं लक्ष वेधून घेत होती. Night Trail हा शब्द ऐकायला आकर्षक वाटतो. पण प्रत्यक्षात त्या वाटेवर चालताना निसर्गाकडे बघण्याची आपली सवयच बदलत जाते. दिवसा दुर्लक्षित राहणारे छोटे छोटे जीव त्या रात्री मुख्य पात्र बनले होते. एखादा चमकणारा कोळी, पानामागे लपलेला बेडूक, ओलसर जमिनीत वाढले...

शोले आणि ‘सांभा’ दगड

इमेज
शोले आणि ‘सांभा’ दगड           ‘शोले’ चित्रपट रिलीज होऊन यंदा पन्नास वर्षे झाली. इतक्या वर्षानंतरही चित्रपट रसिकांमध्ये शोलेची जादू अजूनही कायम आहे. त्यातील दृश्ये, संवाद, गाणी अजूनही तितकीच लोकप्रिय आहेत. यातील केवळ मुख्य कलाकारच नव्हे, तर अगदी लहानात लहान भूमिका करणारेही तितकेच गाजलेत. तुम्हाला “कितने आदमी थे?” असे म्हणत हातातला पट्टा दगडांवर घासत चालणारा गब्बर आठवत असेलच. गब्बरच्या जोडीला  “अरे ओ सांभा!” असा आवाज दिल्यानंतर भल्या मोठ्या दगडावर नेम धरून बसलेला “जी सरदार!” म्हणनारा ‘सांभा’ही डोळ्यांसमोर येत असेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘मैलाचा दगड’ ठरलेल्या आणि गब्बर कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या दगडांची कथाही तितकीच मनोरंजक आहे.       गेली पन्नास वर्षे ‘सांभा’ ज्या राखाडी रंगाच्या दगडांवर बसून गब्बरला उत्तरे देतोय, ज्या दगडांवर ‘जब तक है जान’ म्हणणाऱ्या बसंतीची पावले थिरकलीत, ते दगड तब्बल अडीचशे ते तिनशे कोटी वर्षांपासून तिथे उभे आहेत. बेंगलुरूजवळच्या रामनगरा जिल्ह्यातील हे दगड ‘रामनगर खडक’ याच नावाने ओळखले जातात. याच ...

चिरनेरचा सवतकडा

इमेज
काही ट्रेक हे फक्त डोंगर चढण्यापुरते नसतात.ते स्वतःला थोडंसं नव्याने ओळखण्याचे प्रवास असतात. चिरनेरच्या अक्कादेवी जंगलातून सुरू झालेली ही वाट सुरुवातीला साधी वाटली खरी, पण पुढे पुढे निसर्गाने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. ओले दगड, घसरडी नाळ आणि दाट झाडीमधून काढावी लागणारी वाट. मध्येच एखाद्या दगडावर पाय घसरला, कुणी धडपडलं, तर कुणाच्या कपड्यांवर चिखल उडाला. पण ट्रेकमधल्या अशा छोट्या धडपडीच पुढे आठवणी बनतात. या वाटेची खास गोष्ट म्हणजे इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. शहरातल्या सरळ रस्त्यांची सवय असलेल्या पायांना इथं निसर्गाचा स्वभाव समजतो. कुठे आधारासाठी झाडाची फांदी पकडावी लागते, तर कुठे दगडावर बसून श्वास सावरावा लागतो. आणि मग अचानक धुक्याच्या पडद्याआडून समोर येतो तो सवतकडा. वर पोहोचल्यानंतरचा तो क्षण म्हणजे सगळी दमछाक विसरवणारा असतो. अंगावर थंड वारा, खाली हिरवी दरी आणि मित्रांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा आनंद. त्या कड्यावर बसून केलेलं वनभोजन म्हणजे फक्त जेवण नव्हतं. ती भूकही वेगळी होती आणि त्या जेवणाची चवही. पावसाच्या वातावरणात, निसर्गाच्या साक्षीने खाल्लेला साधा घाससुद्...