वीरगळ : वीरांचे दगड

वीरगळ : वीरांचे दगड (नवे-गांव आंदोलन मासिकाच्या ‘दगडांच्या देशा’ विशेषांकात प्रसिद्ध लेख) रानेवने, गिरीदुर्गांच्या अनघड वाटा असोत की खेडोपाड्यातल्या मळलेल्या वाटा असोत, या मार्गाने निरूद्देश भटकत राहणाऱ्या मुसाफीरांना नेहमीच खुणावणाऱ्या काही गोष्टी असतात. या वरकरणी मूक आणि निर्जीव भासणाऱ्या गोष्टी भटक्यांशी बोलतात देखील. राकट-कणखर आणि दगडांच्या मानल्या जाणाऱ्या महराष्ट्रदेशी खेड्यांच्या वेशीजवळ, मंदिरांजवळ असेच मूक पण इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंगांबद्दल भाष्य करणारे ‘दगड’ आढळतात. कित्येकदा अशा कोरीव दगडांवरील शिलापट आपण कुतूहल म्हणून पाहतो आणि नंतर विसरूनही जातो. प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासातील हे महत्त्वपूर्ण दगडी पुरावे दुर्लक्षामुळे कालांतराने मातीत मिसळून जातात. भारतात प्राचीन काळापासून स्मृती जपण्यासाठी स्मारके उभारण्याची प्रथा आहे. समाधी, वृंदावन, स्मृतीस्तंभ, देऊळ, शिवलिंग असे विविध प्रकार यात आहेत. असाच एक चित्रांकीत स्मृतीदगड म्हणजे ‘वीरगळ’. आता हे ‘वीरगळ’ म्हणजे काय? या दगडाला एवढे महत्त्व का द्यावे? “एखाद्या शूरव...