Posts

Showing posts from January, 2025

धवलारीण

Image
शेती व्यवसायाशी संबंधित सर्वच समाजांमध्ये सण, समारंभ साजरा करण्याचा दिवस, एकूण कालावधी शेतीकामांतून मिळणारी उसंत, उत्पादन यांवर अवलंबून असतो. भातशेती करणाऱ्या समाजाला कापणी, मळणीनंतर बऱ्यापैकी आराम मिळतो. बहुदा या कारणांमुळेच तुलसीविवाहानंतर विवाहोत्सुक उमेदवारांची लग्नकार्ये उरकली जातात. वधू, वर आणि घरच्यांची संमती या तीन घटकांचे एकमत झाले की पुढची तयारी सुरू होते. विवाहाचा अंदाजे दिवस ठरवताना आणखी एक महत्वाची बाब पाहीली जाते, ती म्हणजे या तारखेला विवाह सोहळा पार पाडण्यासाठी आवश्यक गोष्टींची उपलब्धता. यात लग्नाचा हॉल, मांडव, वाजंत्री, पुरोहीत, आचारी हे सर्व उपलब्ध होतील याची खात्री केली जाते. खारेपाटातल्या आगरी, कोळी समाजात मात्र, या सर्वांसह आणखा एका बाबीची खातरजमा केली ती म्हणजे, ‘धवलारीण उपलब्ध आहे का? धवलारीण पारंपरिक पद्धतीने लग्नातील वेगवेगळ्या विधी पार पाडत असते, त्यामुळे तिच्याशिवाय लग्नसोहळा पार पडणे अशक्यच. एखाद्या पुरोहिताप्रमाणेच काम बजावणारी ‘धवलारीण‘ म्हणजे तरी नेमकं काय? याचं एका वाक्यात उत्तर म्हणजे “धवले गाते ती धवलारीण!” अशा वेळी पुन्हा प्रश्न येईल की, ‘धवले म्हणजे क...

‘निरा’ हे सदा के लिए!

Image
  श्रीस्थानक अर्थात सध्याचे ठाणे ही उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी. या राजवंशातील ‘छित्तराजा’चा मुरूडजवळील भोईघर येथे सापडलेला एक ताम्रपट आहे. इसवी सन १०२४च्या या ताम्रपटात नारळ, फणस, चाफा, आंबा यांवरील कर पद्धतीची माहिती दिली आहे. या ताम्रपटातील एका वाक्याची अंमलबजावणी अगदी हजार वर्षानंतरही कायम आहे. ही ओळ अशी आहे- ‘सुरामण्डवृक्षश्चाभ्यन्तरवर्ती बाह्यो वा राजकीय एव’ म्हणजे, ‘ज्या वृक्षांपासून ‘सुरा’ अर्थात दारू निघते, ते सर्व वृक्ष बाहेर असोत वा आत, राजाच्या/सरकारच्या अखत्यारीत आहेत!’ अलिकडच्या काळातील सुप्रसिद्ध ‘सरकारमान्य’ या शब्दाचा उगम अशाच आदेशांमध्ये असल्याचे सांगता येईल. आधुनिक काळातही ताड, माड, खजूर, शिंदी यांसारखे तालवृक्ष सरकारच्या अखत्यारीत येतात. पर्यायाने या वृक्षांशी निगडीत व्यवसायांवर देखील सरकारची नजर असते. आपणही इथे अशाच एका सुरावृक्षाशी संबंधित ‘सरकारमान्य’ व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत; फरक इतकाच की- आपण ‘सुरे’च्या वाकड्या मार्गात न शिरता सरळमार्गाने ‘निरा’ व्यवसायाकडे वळणार(!) आहोत. उन्हाच्या दिवसांमध्ये प्रवास करताना रस्त्याच्या कडेला...

शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा

Image
शिवायविष्णुरूपाय : एक शिल्पकथा     मुंबईच्या उत्तरेला पश्चिम रेल्वे मार्गावरील एक गजबजलेले उपनगर म्हणजे नालासोपारा. भारताच्या जवळपास सर्व राज्यांतील (काही परराष्ट्रातील सुद्धा) माणसे इथे आढळू शकतील इतकी विविधता इथल्या लोकसंख्येत आहे. खरे तर नाळा आणि सोपारा अशी दोन स्वतंत्र गावे इथे आहेत. एका मान्यतेनुसार ही मूळची परशुरामाने निर्माण केलेली भूमी. याचे प्राचीन नाव शूर्पारक. कोणे एके काळी हे शहर एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर आणि कोकण प्रांताच्या राजधानीचं शहर म्हणून वैभवाने भरलेलं होते.  स्वत: गौतमबुद्धांनी या परिसराला भेट दिली असंही सांगितले जाते. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायाची बाजारपेठ म्हणून शूर्पारक बंदर जगप्रसिद्ध होते. इथून परदेशात मोठा व्यापार चालत असे. इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत शूर्पारक नगरी कोकण प्रांताची राजधानी होती. सम्राट अशोकाचा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हे बुद्धगयेहून आणलेली महाबोधी वृक्षाची फांदी घेऊन याच बंदरातून श्रीलंकेला गेले होते. त्यानंतरच जगभर बौद्धधर्माचा प्रसार सुुरु झाला. या प्राचीन नग...