Posts

Showing posts from December, 2024

मोतियाने द्यावी भरून

Image
           मेगॅस्थेनिस हा ‘सेल्युकस निकेटर’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्यां’च्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात तो एकेठिकाणी म्हणतो की, “भारतात सोन्यापेक्षाही मोत्याला अधिक किंमत आहे.” अर्थात भारतीयांच्या दृष्टीने मोत्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. प्राचीन भारतीय वाङ्‌मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदात देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे म्हटले आहे. पुढे वराहमिहीराच्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परीक्षा या प्रकरणात मोत्यांविषयी बरेच लिहिले आहे.        तसे पाहता रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे. नावाप्रमाणेच ते भूगर्भात वगैरे न मिळता थेट शिंपल्याच्या शरीरातच सापडते. अन्न म्हणून शिंपले पकडताना बहुदा या चमकदार आणि आकर्षक रत्नाचा शोध मानवाला लागला असावा. पण त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मोती मिळवण्याच्या उद्देशानेच ही कालवे गोळा केली जाऊ लागली. जगभरात मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. पण भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवा...

देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!

Image
देवदिवाळी: देवांची आणि मनुष्याची...!        आषाढी आणि कार्तिकी  ह्या दोन एकादशी भाविकांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाच्या. याच दोन एकादशींच्या दरम्यान चातुर्मास (चतुर्मास) पाळला जातो. याच काळात कर्क संक्रांतीस सूर्याचे उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास सुरुवात होते. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. थोडक्यात कर्क संक्रांतीपासून देवांची रात्र चालू होते. साधारणपणे कर्क संक्रांत येते आषाढ मासात. याच मासात रात्र असल्याने ‘देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. तर  कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोपेेेेतून जागे होतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवोत्थानी एकादशी’ असे म्हणतात. तसे पाहता दक्षिणायन सहा महिन्यांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण कार्तिकी एकादशीपर्यंत चारच महिने होतात. म्हणजे, एका अर्थाने दिवस उजाडायच्या आतच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. या काळात श्रीविष्णू निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. भगवान विष...