मोतियाने द्यावी भरून

मेगॅस्थेनिस हा ‘सेल्युकस निकेटर’ आणि ‘चंद्रगुप्त मौर्यां’च्या दरबारातील एक राजदूत. याने भारतातील आपल्या वास्तव्याबाबत ‘इंडिका’ हा ग्रंथ लिहीला. या ग्रंथात तो एकेठिकाणी म्हणतो की, “भारतात सोन्यापेक्षाही मोत्याला अधिक किंमत आहे.” अर्थात भारतीयांच्या दृष्टीने मोत्यांचा इतिहास त्यापेक्षाही जुना आहे. प्राचीन भारतीय वाङ्मयात मोत्यांचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदात देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे म्हटले आहे. पुढे वराहमिहीराच्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परीक्षा या प्रकरणात मोत्यांविषयी बरेच लिहिले आहे. तसे पाहता रत्नशास्त्रानुसार मोती हे एक प्राणिज रत्न आहे. नावाप्रमाणेच ते भूगर्भात वगैरे न मिळता थेट शिंपल्याच्या शरीरातच सापडते. अन्न म्हणून शिंपले पकडताना बहुदा या चमकदार आणि आकर्षक रत्नाचा शोध मानवाला लागला असावा. पण त्याचे महत्त्व लक्षात आल्यानंतर मोती मिळवण्याच्या उद्देशानेच ही कालवे गोळा केली जाऊ लागली. जगभरात मोती तयार करणारी कालवे खाऱ्या तसेच गोड्या पाण्यातही आढळतात. पण भारतात मात्र गोड्या पाण्यातील कालवा...